डिग्री पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु अनेक वेळा अपेक्षेप्रमाणे नोकरी किंवा पगार मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जीवनात हारून जाल. खरंतर सुरुवातीला अनेक वेळा अपयश येतं, पण जर तुम्ही काळासोबत पुढे जात राहिलात तर एक दिवस यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. महाराष्ट्रातील उमेश देवकर यांचीही अशीच कहाणी आहे.
महाराष्ट्र मधील पुण्याजवळील वडगाव आनंद येथील रहिवासी उमेश यांनी १९९९ मध्ये मैकेनिकल इंजीनियरिंग ची डिग्री पूर्ण केली. मात्र त्याला काम मिळाले नाही. उमेश सांगतात “मी माझी डिग्री खूप चांगल्या गुणांनी पूर्ण केली होती, त्यामुळे मला चांगली नोकरी मिळेल अशी आशा होती. मी कुटुंबाला मदत करीन. पण असे काहीही झाले नाही. तो मंदीचा काळ होता आणि मला माझ्या क्षेत्रात चांगली नोकरी मिळू शकली नाही. अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी न मिळाल्याने इतर तरुणांप्रमाणे मीही इकडे-तिकडे हात पाय मारण्याच्या प्रयत्न करू लागलो.
उमेश देवकर अवघ्या ३५०० रुपये पगारावर मुंबईत सेल्समनची नोकरी सुरू केली. काळाचा बदल बघा, आज उमेश स्वतः त्याच्या कंपनीचा मालक आहे आणि त्याची वार्षिक उलाढाल अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
उमेश सांगतात , “मी सेलफोन विकण्याचे काम सुरू केले. अनेक तास काम केल्यावर एका महिन्यात ३५०० रुपये पगार मिळत होता, त्यात घरच्या गरजा भागवणे फार कठीण होते. पण तरीही मी काम चालूच ठेविले. घरातील जबाबदाऱ्या वाढू लागल्याने पगारावर जगणे कठीण झाले आणि मी स्वतःचा काही व्यवसाय करायचा असे ठरवले.
काही वर्षे काम केल्यानंतर उमेश आपल्या गावी परतला आणि घरची शेती करू लागला.
शेतीत नफा-तोटा होत होता. त्यामुळे केवळ घर चालेन एवढंच उत्पन्न होत होते. अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी त्यांनी चारा विकण्यास सुरुवात केली. उमेश म्हणतात, “आमच्या भागात उसाची भरपूर लागवड आहे. त्यातून चारा तयार करण्यासाठी मी काही मोठ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून चारा खरेदी करायचो आणि आजूबाजूच्या परिसरातील डेअरी फार्मला भेट देऊन विकायचो. हे काम शेतीबरोबरच दीर्घकाळ चालू राहिले. त्यानंतर, मी ट्रान्सपोर्ट व्यवसायात सामील व्हावे म्हणून काही पैसे गोळा करून आणि कर्ज घेऊन स्वतःसाठी टेम्पो खरेदी केला,” तो म्हणाला.
मात्र, वाहतुकीच्या कामातही त्यांना अनेकवेळा त्रास सहन करावा लागला. उमेश सांगतात, “एक काळ असा होता की मुलाची फी भरायलाही पैसे नव्हते. मुलाला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण हेही खरं आहे की आयुष्यात वाईट काळ जास्त दिवस राहत नाही. त्यामुळे मी फक्त मेहनत करत राहिलो आणि देवाच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि ही संधी मी हातून जाऊ दिली नाही.”
उमेश सांगतात की २०१७ पर्यंत त्यांची शेती आणि काही ट्रांसपोर्ट चे कामे चालू होती. “आम्ही भाजीपाला पिकवतो. आता बाजारात शेतमालाला काय भाव मिळतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यावर वाहतुकीचा खर्चही आहे. पण २०१७ मध्ये, महाराष्ट्र सरकारने बदल केला आणि शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला शहरांमध्येच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी आढ़तिया नी संप केला आणि मला कळले की भांडुपमध्ये भाजीपाला पुरवठा होत नाही,”
ही संधी समजून त्यांनी भाजीपाला घेऊन भांडुप ला गेले. तिथे एका सोसायटीबाहेर त्याने आपला ठेला उभा केला आणि बघता बघता त्याचा भाजीपाला विकला गेला. तो सांगतो की, त्यावेळी आपल्याला किती नफा झाला हे लक्षात आले नाही. पण त्याला हे समजल की त्याचा प्रगतीची सुरवात झाली आहे . यानंतर उमेशने मागे वळून पाहिले नाही. आधी भांडुप आणि नंतर मुलुंडमध्ये अशा प्रकारे भाजीपाला विकायला सुरुवात केली. तो म्हणतो, “मी आदल्या रात्री सगळ्या ताज्या भाज्या तोडून स्वच्छ करायचो आणि सकाळी लवकर शहरात पोहोचायचो. नंतर जागोजागी ठेले लावून भाजीपाला विकायचा. अनेक तास उन्हात उभे राहायचे आणि संध्याकाळी गावात पोहोचल्यावर दुसऱ्या दिवसाची तयारी करायची. असे दिवस होते की दोन-तीन दिवस झोपायला मिलत नव्हते.
उमेश च्या मेहनतीला फळ मिळायला सुरवात झाली आणि ग्राहक त्याला जोडू लागले. त्यानंतर त्यांनी भांडुप आणि मुलुंडच्या विविध भागात छोटी दुकाने भाड्याने घेऊन स्वत:चे आऊटलेट सुरू केले. ठरलेल्या जागेमुळे लोक त्याच्याशी व्हाट्स अँप वर कनेक्ट होऊ लागले. बरेच लोक त्याला होम डिलिव्हरीसाठी विचारू लागले.
उमेशने ‘फार्म टू होम’ या नावाने आपली फर्म रजिस्टर करून घेतली. लवकरच, त्यांचे ग्राहक वाढू लागले आणि त्यांची उत्पादनेही वाढू लागली. त्याच्याकडून नियमित भाजी घेणारे ग्राहक त्याला डाळी, तेल वगैरे देऊ शकतात का, असे विचारू लागले, असे त्याने सांगितले. अशा परिस्थितीत उमेशने आपल्या ग्राहकांना नाकारण्याऐवजी त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी आपल्या परिसरातील छोट्या-मोठ्या प्रोसेसिंग युनिट्सशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यामुळे उमेशच्या व्यवसायाबरोबरच त्याच्या ग्राहकांची संख्याही वाढली.
२०२० मध्ये लॉकडाऊनने त्यांचा व्यवसाय खूप पुढे नेला. जेव्हा सर्व लोक आपापल्या घरात बंद होते तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्याशी सतत भाजीपाला, रेशन इत्यादीसाठी संपर्क करत होते. यादरम्यान त्यांनी त्यांची ऑनलाइन वेबसाइट ekrushk.com सुरू केली. ज्याद्वारे लोक त्यांना थेट ऑर्डर देतात आणि ते त्यांच्या घरी वस्तू पोहोचवतात. त्यांची सेवा आज मुंबई आणि ठाण्यात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ३००० ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. याशिवाय तो आपल्या गावातील व परिसरातील लहान-मोठ्या सुमारे ५० शेतकऱ्यांकडून फळे, भाजीपाला, डाळी आदींची खरेदी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.
उमेश सांगतो “सध्या आमच्याकडे दोन-तीन रिटेल सेंटर्स आहेत जिथे आम्ही आठवड्यातून एकदा भाजी विकतो. आमची भाजी साधारण आठवडाभर चांगली राहते कारण मी ताज्या भाज्या शेतातून उपटून थेट लोकांपर्यंत पोहोचवतो,”
आज उमेश आपल्या व्यवसायातून ३० जणांना काम देत आहे. त्यांनी सांगितले की या वर्षी त्यांची उलाढाल २.५ कोटी रुपये होती आणि येत्या वर्षात ती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
उमेश सांगतो , “आता मी माझ्या कुटुंबाला ते जीवन देऊ शकलो आहे ज्याचे मी स्वप्न पाहत होतो. माझ्या कुटुंबाने कधीही व्यक्त केले नाही परंतु नेहमीच आर्थिक तंगी पाहिली आहे. मला अभ्यास करता यावा म्हणून वडील आणि काका मुंबईत खोली करून राहत होते. मग त्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी रात्रंदिवस काम केले. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले आहे आणि मी सर्वांना सांगतो की पुढे जा. जर तुम्हाला तुमचे काम करण्याची आवड असेल तर तुमचा व्यवसाय छोट्या पद्धतीने करा. पण प्रयत्न न करता कधीही हार मानू नका.