परदेशातील नोकरी सोडून या जोडप्याने फूड ट्रकचा व्यवसाय सुरू केला, टर्नओवर आहे दीड कोटी रूपये

दिल्ली मधे राहणारे ज्योती गणपती आणि सत्या कोनिकी गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा फूड ट्रक व्यवसाय चालवत आहेत.

जर तुम्हाला दक्षिण भारतीय जेवण आवडत असेल तर तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल. ही कथा दिल्लीतील एका जोडप्याची आहे, ज्यांनी परदेशातील नोकरी सोडून देशात खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला. फूड बिझनेसमध्येही हे जोडपे काहीतरी वेगळे करत आहेत, त्यांनी ट्रकला त्यांचे फूड आउटलेट बनवले आहे, ज्याद्वारे ते दिल्लीच्या विविध भागात जाऊन लोकांना स्वादिष्ट दक्षिण भारतीय जेवण देतात.

ज्योती गणपती आणि सत्या कोनिकी गेल्या ८ वर्षांपासून स्वतःचा खाद्यपदार्थ व्यवसाय चालवत आहेत. विशेष म्हणजे, त्याचे आउटलेट निश्चित नाही आहे परंतु ते एक फूड ट्रक चलवातात ज्याला त्यानी डोसा इंक Dosa Inc हे नाव दिले आहे.

तिच्या प्रवासाविषयी बोलताना ज्योती सांगते की, “लहानपणी टी बहुधा ५ वर्षांची होती , जेव्हा तिने पहिल्यांदा खूप सजवलेला ट्रक पाहिला होता. तिला अजूनही तो ट्रक आठवतो. मात्र, नंतर कधी तिला स्वतःचा ट्रक असेल असे वाटले नव्हते. त्याचप्रमाणे ती जेव्हा मोठा झाली तेव्हा तिला स्वप्न पडू लागलं की कुठल्यातरी मार्केटमध्ये माझा स्वतःचा डोसा स्टॉल असावा. ती म्हणते माझे लग्न झाल्यावर हे स्वप्न पूर्ण झाले, खरे तर माझ्या पतीलाही फूड बिझनेसमध्ये काहीतरी करायचे होते.”

ज्योतीने अमेरिकेतून ग्रॅज्युएशन केले आणि नंतर मानव संसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. दुसरीकडे तिचे पती सत्या यांनी टेलिकॉममध्ये मास्टर्स केले असून त्यांना अमेरिका आणि भारतातील चांगल्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभवही आहे. अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर सत्या आणि ज्योती यांनी स्वयंपाकाची आवड जोपासण्याचे ठरवले. मग काय, २०१२ साली त्यांनी स्वतःचा फूड ट्रक Dosa Inc सुरू केला.

सत्या आणि ज्योती यांनी दिल्लीच्या अलकनंदा परिसरात सुरवात केलि आणि पहिल्याच दिवशी अवघ्या 3 तासांत 30 किलो पिठात बनवलेला मेदू वडा विकला. या जोडप्याने त्यांच्या व्यवसायात एक नियम केला की ते स्वतः ग्राहकाकडे जातील आणि यामध्ये त्यांना फूड ट्रकचा आधार मिळाला. या नियमाचे पालन करून त्यांनी आतापर्यंत नोएडा, दिल्ली आणि गुरुग्राममधील सुमारे ५० हजार ग्राहकांना दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ पोहोचवले आहेत. या खाद्य व्यवसायातून त्यांनी आतापर्यंत दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 त्यांच्या मेनूमध्ये रवा डोसा, कांदा टोमॅटो उत्तपम, मेदू वडा, फिल्टर कॉफी बंदकई वेपुदु, मालाबार पराठा आणि टेंगोजल लाडू बर्फी यांचा समावेश आहे. पती-पत्नी दोघेही फूड ट्रक घेऊन रेसीडेंशल सोसायटी, ऑफिस कॉम्प्लेक्स कडे घेऊन जातात. ज्योती सांगतात की, जिथे ते ट्रक पार्क करतात , त्या भागात होम डिलिव्हरी सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.

 सत्या सांगतात, “स्वतःचे फूड स्टार्टअप सुरू करणे हे आमचे आयुष्याचे स्वप्न होते. आम्हालाही रेस्टॉरंट सुरू करायचं होतं पण योग्य जागा निवडणं आणि गुंतवणूक जास्त असल्यासारख्या अनेक समस्या होत्या. फूड ट्रक परदेशात सामान्य आहेत परंतु येथे नाही. भारतात फूड ट्रकची संकल्पना एका ठिकाणी पार्क करून लोकांना सेवा देणे ही आहे. पण आम्हाला त्यापलीकडे काहीतरी करायचे होते.”

 स्वयंपाकघर उभारण्यासाठी त्यांचा सुमारे एक लाख रुपये खर्च झाल्याचे सत्या सांगतात . ते म्हणतात, “चांगले अन्न बनवण्यापेक्षा फूड ट्रक सेट करणे हे जास्त कठीण काम आहे. चांगले अन्न शिजवण्याइतकेच वाहनाची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.”

सत्याने याआधी टेम्पो ट्रॅव्हलर घेतली होती पण ती खूप जड होती आणि त्यात सर्व गोष्टी घेऊन प्रवास करणे खूप अवघड होते. त्यामुळे त्यांनी सीएनजीवर चालणारी टाटा एसी खरेदी केली. ते पर्यावरणपूरक देखील आहे त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सीमा ओलांडताना ८०० रुपये ग्रीन फी भरावी लागत नाही.

 यानंतर त्यांनी सांबार आणि चटणी बनवण्यासाठी बेस किचन तयार केले. याबद्दल ज्योती सांगतात, “आम्ही एक सामान्य ट्रक विकत घेतला आणि नंतर त्याचे फूड ट्रकमध्ये रूपांतर केले. ट्रकचा आकार आणि इतर सर्व गोष्टी तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न शिजवणार आहात आणि ट्रकचा उद्देश यावर अवलंबून आहे – तुम्ही ट्रक इकडे तिकडे घेऊन जाणार आहात किंवा एकाच ठिकाणी ट्रक पार्क करून काम करणार आहात . बेस किचन ती जागा आहे जिथे बहुतेक स्वयंपाक आणि साफसफाईची कामे केली जातात. ती व्यावसायिक ठिकाणी असावी आणि कमी भाड्याने व थोडे शांत असावी .”

ज्योती सांगतात की जर तुमचा फूड ट्रकचा व्यवसाय असेल तर तुम्हाला परमिट, लायसन्स वगैरेचीही गरज लागेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या राज्याच्या मोटार वाहनाशी संबंधित नियमांची माहिती असणे आवश्यक आहे, ज्यात फायर डिपार्टमेंट चे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, वाहन परवाना, जीएसटी नोंदणी, हेल्थ ट्रेड लाइसेंस यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की जर तुमच्या व्यवसायाची उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर FSSAI चे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

ज्योती आणि सत्या यांनी त्यांचा फूड बिझनेस अशा वेळी सुरू केला जेव्हा फूड डिलिव्हरी ची कोणत्याही प्रकारचे अँप नव्हते. लोक ऑनलाइन ऑर्डर करण्यास कचरत होते. अशा स्थितीत त्यांनी मार्केटिंगसाठी छापील पत्रके (PAMPHLET) स्वत:हून लोकांपर्यंत पोहोचवली. ज्यामध्ये त्यांचा मेनू आणि वेगवेगळ्या भागात येण्याची वेळ लिहिली होती. नंतर, त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील काही सोशल मीडिया प्रभावकांची निवड केली, जे त्यांचे मेनू वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतील. तसेच, ट्रक चांगले सजवणे आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेणे हा त्यांच्या मार्केटिंगचा आणखी एक मार्ग होता.


ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ज्योतीने दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले, पहिले, तिने ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते निर्माण केले आणि त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्या ती समजून घेत होती . जेवणात मीठ कमी ठेवणं, सांबराचं प्रमाण वाढवणं किंवा कमी करणं- या छोट्या-छोट्या गोष्टींचीही काळजी घेतली. कदाचित त्यामुळेच त्यांनी अवघ्या ६ महिन्यांत ८०० कुटुंबांचा विश्वास जिंकला आणि ते त्यांचे नियमित ग्राहक बनले . आज सुमारे २०० परिसरात हजारो कुटुंबे त्यांचे ग्राहक आहेत.

तिची एक ग्राहक पूजा मानशानी हिला तिच्या जेवणाची चव आणि दर्जा दोन्ही इतके आवडते की ती त्यांच्याकडूनच दक्षिण भारतीय पदार्थ ऑर्डर करते.

पूजा सांगते, “दोन वर्षांपूर्वीची गोष्ट होती. मी डोसा इंक ट्रक पहिला आणी वडा ट्राय केला. त्यांची गुणवत्ता आणि प्रमाण नेहमी एक सारखेच असते आणि त्यांच्या स्टाफचे सर्व १६ सदस्य नेहमी त्यांच्या डोक्यावर टोप्या आणि हातात हातमोजे घालतात.”

लॉकडाऊन दरम्यान, ते स्वच्छतेबद्दल अधिक काळजी घेत होते कारण त्याने मास्क आणि फेस शील्ड घालून च काम केले होते.

ज्योती आणि सत्या यांनी नवीन क्षेत्रात काम सुरू केले आहे. कॅटरिंगपासून ते सोशल इवेंट्स आणि मॅरेथॉन इत्यादि कार्यक्रमात ते सेवा देतात. गेल्या वर्षी त्यांनी दक्षिण भारतीय स्नॅक्स देखील लाँच केले ज्यात मुरुक्कू, दक्षिण भारतीय मिश्रण, लाडू, म्हैसूर पाक, नारळ बर्फी यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्येही त्यांनी या स्नॅक्समधून च कमाई केली आहे. हे स्नॅक्स त्यांच्या ट्रक (Food Truck Business) मधून विकले जातात आणि तुम्ही कॉल करून ऑर्डर करू ही शकता.

यासोबतच त्यांनी आता इको फ्रेंडली कटलरी वापरण्यास सुरुवात केली आहे. ते पेपर बॉक्स मधे पॅक करतात आणि ट्रकवर खाणाऱ्यांना पत्रांळीत डिशेस देतात आणि कागदाच्या कपांमध्ये सांबर आणि चटणी दिली जाते. या सर्व वर्षांत त्यांचा ग्रोथ रेट ३५% नि वाढला आहे. मात्र या सगळ्यासोबत त्याला अनेक अडचणींचाही सामना करावा लागला आहे.

ज्योती म्हणते, “अडचणी अजूनही आहेत. आम्हाला परमिट आणि सेफ्टी प्रोटोकॉलबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. नगर पालिकेशी व्यवहार करणे देखील सोपे काम नाही आणि त्यात बरीच कागदपत्रे लागतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की आता मी मोटार वाहन नियमांमध्ये एक्सपर्ट झाले आहे.”

Post a Comment (0)
Previous Post Next Post